फळ विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

फळ विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Published on

फळ विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
पनवेल, ता. ९ (बातमीदार) ः केंद्र शासनाने फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत सोमवार (ता. १५)पर्यंत वाढविली आहे. या मुदतवाढीमुळे कोकण विभागातील आंबा, काजू तसेच महाराष्ट्रातील संत्रा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उशिरा नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत सोयीचा ठरणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी भगवान हेगडे यांनी सांगितले.
पनवेल तालुक्यातील ५०० हेक्टर फळबाग क्षेत्र आणि १,४०० फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा थेट लाभ होणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र शासनाने दिलेली १५ डिसेंबरची मुदतवाढ केवळ भारतीय कृषी विमा कंपनीच्या अखत्यारीतील जिल्ह्यांनाच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीच्या नोंदीनुसार, जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी मुदतवाढीस नकार दिल्याने तेथील शेतकऱ्यांना वाढीव लाभ मिळणार नाही.
इच्छुक शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टल www.pmfby.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करून फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी भगवान हेगडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com