अंबरनाथमध्ये कमळच फुलणार - मनोज तिवारी
अंबरनाथमध्ये कमळच फुलणार ः मनोज तिवारी
अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) ः शहरात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. जनतेला लुटले आहे. तर नागरिकांचे मत हाच खरा ईडी आणि हेच मत अंबरनाथमध्ये परिवर्तन घडवणार आहे. अंबरनाथमध्ये सत्ता पालट होऊन कमळच फुलणार, असा ठाम विश्वास भोजपुरी अभिनेता आणि भाजपनेते मनोज तिवारी यांनी परिवर्तन रॅलीत व्यक्त केला.
शुक्रवारी (ता. १२) परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा ते सर्वोदयनगर या परिसरात, प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार मीना वाळेकर, पवन वाळेकर, मिनू रवींद्र सिंग तसेच पाचचे उमेदवार प्रजेश तेलंगे व ऊर्मिला सुरेंद्र यादव आणि नगराध्यक्षपदाच्या दावेदार तेजश्री करंजुळे-पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

