खोटे बोलून जनतेची दिशाभूल

खोटे बोलून जनतेची दिशाभूल

Published on

खोटे बोलून जनतेची दिशाभूल
राधाकृष्ण विखेंवर मार्कुस डाबरे यांची टीका
विरार, ता. १३ (बातमीदार)ः राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात वसई-विरारमधील दहशत भाजपने संपवली, असे विधान केले होते. या विधानाचा हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी समाचार घेतला.
वसई-विरारमधील दहशतीविरोधात २५ वर्षांपूर्वी दिवंगत फादर फ्रान्सिस डिबेटो यांच्या नेतृत्वात ख्रिस्ती समुदायाने एकत्र येत ‘हरित वसई संरक्षण समिती’तर्फे मोठी चळवळ उभी केली होती. या संघर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळे मंत्र्यांनी नालासोपाऱ्यात येऊन वसईची गुंडगिरी आम्ही मोडली, असे विधान करणे ही दिशाभूल असल्याचे मार्कुस डाबरे म्हणाले. विखे-पाटील यांनी त्यांच्या पक्षातील लोक त्या वेळी नेमके कुठे होते, याचा शोध घ्यावा. तसेच हा लढा राज्य, राष्ट्रीयस्तरावर गाजला असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com