प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची रखडपट्टी
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची रखडपट्टी
दीड वर्षापासून फळबाग लागवडीच्या अनुदानाची प्रतीक्षा; शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप
तळा, ता. १३ (बातमीदार) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना एकात्मिक पाणलोट घटक २.० अंतर्गत तळा तालुक्यात फळबाग लागवड केलेल्या शेतकरी बांधवांना दीड वर्ष उलटूनही एक रुपयाचेही अनुदान मिळालेले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्नाळा फळशेत, सोनसडे, कलमशेत, अडनाळे, भानंग, वृंदावन आदी गावांतील शेतकऱ्यांनी २०२४ मध्ये आंबा व काजूची लागवड केली होती, मात्र २०२५ वर्ष संपत आले तरी अनुदानाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
योजनेच्या अटी-शर्ती पूर्ण करताना शेतकऱ्यांनी भरपावसात रोपे आणून जमिनीत खड्डे खोदले, लागवड केली, खते व कीटकनाशकांचा वापर केला. ऊन, वारा व पावसापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या कालावधीत नियमित पाणी देणे, कंपाउंडिंग करणे, तसेच झाडांचे जतन करण्यासाठी मोठा खर्च व मेहनत घेतली. सध्यादेखील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गवत काढणे व पाणी देण्याची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मृद व जलसंधारण विभाग, अलिबाग यांच्या अंतर्गत तपासणी व मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहेत, असे असतानाही संबंधित बिले का काढली जात नाहीत, अनुदान देण्यास विलंब का होत आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शेती हा देशाचा कणा असताना आणि शेतकरी ‘जगाचा पोशिंदा’ मानला जात असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अशी वेळ येणे चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

