वणव्यामुळे जगंलाची राखरांगोळी
वणव्यामुळे जगंलाची राखरांगोळी
सुतारवाडीतील वृक्ष होरपळले, शेतकरी, बागमालक चिंतित
रोहा, ता. १५ (बातमीदार)ः तालुक्यातील सुतारवाडी परिसरातील डोंगर परिसरात दरवर्षी वणवे लावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. या वणव्यात मोठ्या प्रमाणात जिवंत झाडे, निसर्गाची हानी होत असते, पण वणवे रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.
सुतारवाडी परिसरातील नारायण गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रवाळजे फाटा येथील डोंगराला रविवारी (ता. १४) वणवा लावण्यात आला. सध्या वातावरणातील थंडीमुळे अनेक लहान मोठ्या झाडांना पालवी फुटली आहे. अशातच वणव्यामुळे झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेत प्राण्यांचे निवारा नष्ट झाला आहे. याकडे वन खात्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
-----------------------------
पर्यावरणाशी खेळ
वन्य प्राण्यांना निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर जंगलातील रानमेवा चाखायला मिळणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

