मुंबईत आंतरराष्ट्रीय शिखर परिषद 2025

मुंबईत आंतरराष्ट्रीय शिखर परिषद 2025

Published on

महाराष्ट्राचे नेतृत्व विश्वासावर आधारित
आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत मंत्री रावल यांचे प्रतिपादन

घाटकोपर ता. १७ (बातमीदार) : देशाच्या विकासाचे इंजिन असलेले महाराष्ट्राचे नेतृत्व प्रोत्साहनांवर नव्हे, तर धोरण, वितरण आणि विश्वासावर आधारित असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांनी केले. सीआयआय मुंबई आंतरराष्ट्रीय शिखर परिषद २०२५ मध्ये ते बोलत होते.
मुंबई हे भांडवल, प्रतिभा आणि नवोपक्रम यांचे जागतिक केंद्र असून, ते भविष्याची वाट न पाहता आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचे रावल यांनी नमूद केले. परिषदेत मुंबईच्या जागतिक आर्थिक, नवोपक्रम आणि शाश्वत विकासातील भूमिकेवर भर देण्यात आला.
सीआयआय पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष ऋषी कुमार बागला यांनी मुंबईला महत्त्वाकांक्षी आणि नवनिर्मितीचे प्रतीक म्हणून संबोधले. उपाध्यक्ष वीर एस. अडवाणी यांनी बहु-ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना उद्योगांच्या जबाबदार नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषद अध्यक्ष वैभव वोहरा यांनी नवी मुंबई विमानतळ, लिंक रोड व एक्सप्रेसवे यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट होत असल्याचे म्हणाले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनीही मुंबईची जागतिक भागीदारी व व्यापारातील भूमिका अधोरेखित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com