पालघरसह वसई-विरार मध्ये बच्चू कडू यांना धक्का
पालघरमध्ये ''प्रहार''ला भगदाड
जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
विरार, ता. १८ (बातमीदार) : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ सुरू असून, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, इतर पक्षांतील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. यापूर्वी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) नऊ माजी नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रहारने जिल्ह्यात अनेक आंदोलने आणि जनहिताची कामे केली होती; मात्र मुख्य पदाधिकाऱ्यांनीच पक्ष सोडल्याने जिल्ह्यात प्रहारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
भाजपच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, वसई-विरार निवडणूक प्रभारी व आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, मनोज बारोट, महेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. जिल्ह्यात आक्रमक आंदोलनांमुळे चर्चेत राहिलेला प्रहार पक्ष आता प्रमुख कार्यकर्त्यांच्या जाण्यामुळे कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

