आसूफमध्ये श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
आसूफमध्ये श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
श्रीवर्धन, ता. १८ (वार्ताहर) ः तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी कृषी विभागाच्या पुढाकाराने आसुफ गावात वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील जलसाठ्यात वाढ होणार असून शेतीसाठी संरक्षित पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आसुफ गावातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सहाय्यक कृषी अधिकारी पंकज पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. जलस्रोत टिकवण्याच्या उद्देशाने नाले, झरे आणि पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी बंधारे उभारले जातात, ज्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी टिकते. या बंधाऱ्यामुळे आसुफ परिसरातील विहिरी व बोरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शेती, पशुधन तसेच जंगलातील प्राणी आणि गावकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. बंधारा उभारणीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य जयंत राजाराम सावंत, पोलिस पाटील संदेश कृष्ण दरेकर, सहाय्यक कृषी अधिकारी पंकज पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदानातून उभारलेला बंधारा आसुफ परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण करेल आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाय ठरेल, असे पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

