पाणवायू , पर्यावरणाला महत्व द्या : नारायण मानकर
प्राणवायू, पर्यावरणाला महत्त्व द्या
माजी महापौर नारायण मानकर यांचे आवाहन
वसई, ता. १८ (बातमीदार) : ‘‘सृष्टी शुद्ध राखण्यासाठी वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. पुढच्या पिढीने झाडे लावण्याचे आणि ती जगवण्याचे कार्य केले पाहिजे,’’ असे प्रतिपादन माजी महापौर नारायण मानकर यांनी वसईत केले. वसई पश्चिम येथील समाज उन्नत्ती सभागृहात नन्हे हाथ फाउंडेशनतर्फे आयोजित सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये किरण कामदार, नम्रता नेवे, हिरेन सावला, कल्पेश मेहता, योगिता नाईक यांच्यासह अन्य मान्यवर व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. यावेळी मोबाईल व इंटरनेटचे चांगले-वाईट परिणाम दर्शवणारी चित्रफीतही दाखवण्यात आली.
संस्थेचे संस्थापक संजय वैष्णव यांनी सांगितले, की प्रकाशझोतात न येता समाजहित जपणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाला कल्पेश मानकर, डॉ. विजय शिरीषकर, ललित चव्हाण, सेजल शहा यांसह संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

