सततचा सुका–ओला दुष्काळ आणि वाढता खर्च : हमीभाव वाढवून देण्याची कुणबी सेनेची मागणी
भातपिकाला हमीभाव वाढवून देण्याची कुणबी सेनेची मागणी
विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : सततचा सुका-ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतीकामांच्या वाढत्या खर्चामुळे भातशेती पूर्णपणे तोट्यात चालली आहे. या पार्श्वभूमीवर, भातशेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने भातपिकाला प्रति क्विंटल किमान चार हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी ठाम मागणी कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली आहे.
सध्या बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे; मात्र त्या तुलनेत भाताला मिळणारा सरकारी भाव अत्यंत कमी आहे. जर शासनाने तातडीने हमीभाव वाढवला नाही, तर शेतकरी भातशेतीपासून कायमचा दुरावेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हमीभाव वाढवण्यासोबतच पीकविमा, सिंचन सुविधा आणि वेळेवर शासकीय खरेदी सुरू करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. या मागणीला विविध शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दर्शविला असून, सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भातशेती संस्कृती नामशेष होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

