जलसमृद्ध गावांसाठी धडपड
जलसमृद्ध गावांसाठी धडपड
वनराई बंधाऱ्यांसाठी अधिकारी, ग्रामस्थांचे श्रमदान
मोखाडा, ता. २० (बातमीदार) ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावे जलसमृद्ध करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या श्रमदानातून बंधारे बांधण्यात येत आहेत. याच अनुषंगाने एकट्या मोखाडा तालुक्यात १०० हून अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांना दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोखाड्यात वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. वनराई बंधारे श्रमदान आणि लोकसहभागातून करण्यात येत आहे. जलसमृद्ध गाव ही संकल्पना शासनाने आखली आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोखाड्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कामाला लागले आहे. कारेगाव ग्रामपंचायत येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. येथे गटविकास अधिकारी अक्षय पगार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी हातात टिकाव, घमेले आणि फावडे घेऊन वनराई बंधारा पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष काम केले, त्यांना ग्रामस्थांची साथ मिळाली.
-------------------------
२७ ग्रामपंचायतींचा सहभाग
या अभियानात २७ ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. याच अनुषंगाने तालुक्यात १०० हून अधिक वनराई बंधारे बांधण्यात येणार असून किमान दोन महिने पाणीटंचाईला आळा बसेल, जनावरांची पाण्याची समस्या सुटेल, असा विश्वास गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

