बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती
भाईंदर, ता. २० (बातमीदार) : बिबट्यांचे मानवी वस्तीवर हल्ले होऊ नयेत, यासाठी कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून सतर्कता बाळगली जात आहे. भविष्यात हे हल्ले लोकांच्या जीवावर बेतणार नाहीत यासाठी वन विभाग व सरकार सतर्क राहणार आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. बिबट्याने हल्ला केलेल्या भाईंदर येथील पारिजात इमारतीला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
या वेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. वनमंत्री म्हणाले, की संपूर्ण राज्यात सुमारे पाच हजार बिबटे असून एकट्या जुन्नर तालुक्यात साडेसातशे बिबटे आहेत. त्याचप्रमाणे राज्यात ४४४ वाघ आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. बिबट्याचे हल्ले नागरी वस्तीत होऊ लागले आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जंगलात नागरी वस्ती वाढत असल्याने वन्यजीवही त्रस्त झाले आहेत.
मात्र सर्वच बिबटे जंगलातले नाहीत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर इत्यादी ठिकाणी उसाच्या शेतात बिबट्यांचा जन्म झाला आहे. तेथेच ते वाढले आहेत. बिबट्या आतापर्यंत सूची १चा प्राणी म्हणून ओळखला जातो, मात्र काही बिबटे शेतीत वाढले आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश सूची २मध्ये करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात लोकांचे प्राण जात आहेत याचे दु:ख आहे. असे हल्ले पुन्हा होणार नाहीत यासाठी वन विभागाकडून दक्षता घेण्यात येईल, असे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

