पालघरच्या गार्गीची नवी दिल्लीत चर्चा
पालघरच्या गार्गीची नवी दिल्लीत चर्चा
भारत युवा प्रतिनिधी परिसंवादासाठी राज्यातून निवड
पालघर, ता. २३ ः नवी दिल्लीतील राष्ट्रीय युवा महोत्सवअंतर्गत विकसित भारत युवा प्रतिनिधी परिसंवादासाठी महाराष्ट्र राज्य संघात पालघरच्या डॉ. गार्गी पाटील यांची निवड झाली आहे. राज्यस्तरावर उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार आहे. या महोत्सवात देशभरातील निवडक युवा नेतृत्व विकास, नवोन्मेष, धोरणात्मक विचार आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित संवादात सहभागी होणार आहेत. डॉ. गार्गी राजेश पाटील यांनी मांडलेली ‘निसर्गवेद’ ही संकल्पना अत्यंत प्रभावशाली असून, भावी भारताला शाश्वत प्रगतीसाठी निसर्गाचा समतोल राखण्याचे मार्ग दर्शवणारी आहे. राज्यस्तरीय निवड प्रक्रियेत सादर केलेली अभ्यासपूर्ण मांडणी, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्यांची निवड झाली आहे. स्पर्धेतील त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्राच्या शैक्षणिक व युवा नेतृत्व परंपरेला उज्ज्वल करणारे आहे.
------------------------------
हजारो स्पर्धकांचा सहभाग
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतून स्पर्धेच्या पहिल्या ऑनलाइन फेरीमध्ये हजारो स्पर्धकांमधून १२,२१९ स्पर्धकांना निबंध लेखनासाठी निवडण्यात आले. या निबंधांपैकी डॉ. गार्गी राजेश पाटील यांचा निबंध सादरीकरणासाठी उत्कृष्ट ५०८ मध्ये निवडला गेला. त्यानंतर पहिल्या ७८ उमेदवारांमध्ये जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पाटील यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

