‘जल जीवन मिशन’वरून रोष
‘जल जीवन मिशन’वरून रोष
जव्हार पंचायत समितीवर सरपंचांचा हंडा मोर्चा
जव्हार,ता.२३ (बातमीदार)ः तालुक्यात ‘हर घर जल’चा गजर करणाऱ्या जल जीवन मिशनचे तीनतेरा वाजले आहेत. दोन वर्षांपासून रखडलेल्या अपूर्ण पाणीपुरवठा कामांमुळे ग्रामस्थांचे हाल होत असल्याने जव्हार सरपंच संघटनेने पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता.
जव्हार मधील ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे या भागात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाईपलाईन, जलकुंभ, नळ जोडणीची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक ठेकेदारांनी कामे सुरू करून बंद केल्याचा आरोप सरपंच संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेची कामे ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्णत्वास यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
---------------------------
प्रशासनाची डोळेझाक
उन्हाळा तोंडावर असताना पाणीटंचाईची तीव्र झळ बसत असतानाही प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अपूर्ण कामे तात्काळ सुरू करा, निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, अशा मागण्या सरपंच संघटनेने ठामपणे मांडल्या.
या हंडा मोर्चात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

