पाणी टंचाईवर वनराई बंधाऱ्यांचा उपाय

पाणी टंचाईवर वनराई बंधाऱ्यांचा उपाय

Published on

पाणीटंचाईवर वनराई बंधाऱ्यांचा उपाय
गांगोडी येथे ग्रामस्थांचे श्रमदान

कासा, ता. २३ (बातमीदार) : ग्रुप ग्रामपंचायत शेणसरी अंतर्गत महसूल गाव गांगोडी येथे श्रमदानाच्या माध्यमातून चार वनराई बंधाऱ्यांची बांधणी करण्यात आली. उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या वेळी ग्रामपंचायत शेणसरीच्या सरपंच साधना नीलेश बोरसा, ग्रामपंचायत अधिकारी जिज्ञा पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश भुसारा यांच्यासह अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, बचत गटातील महिला व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तसेच गायी, गुरे, बकऱ्या यांसारख्या पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन गावातील नदी-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा होणार असून, परिसरातील जलस्रोत अधिक काळ टिकून राहण्यास मदत होणार आहे.

जलसंवर्धनाचे महत्त्व

वनराई बंधाऱ्यांमुळे साठवलेल्या पाण्याचा उपयोग केवळ पिण्यासाठीच नव्हे तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठीही करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. याचबरोबर पाण्याची बचत, पाण्याचे योग्य नियोजन व जलसंवर्धनाचे महत्त्व याबाबत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com