पालघर येथील साधूंच्या जमावाकडून हत्येचे प्रकरण

पालघर येथील साधूंच्या जमावाकडून हत्येचे प्रकरण

Published on

पालघर साधू हत्याप्रकरणी
आरोपींचा जामीन फेटाळला
सबळ पुरावे असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पालघर जिल्ह्यात एप्रिल २०२०मध्ये जमावाकडून झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींचा जामीन अर्ज मंगळवारी (ता. २३) उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
राजेश राव, सुनील दळवी, विनोद राव आणि सजनुआ बुरकूड यांना साधू हत्या प्रकरणात अटक केली होती. सध्या चौघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आतापर्यंत ४२ आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. दीर्घकाळ तुरुंगवासात असल्याच्या कारणास्तव आणि समानतेच्या आधारावर त्यांनी जामिनाची मागणी केली होती. एखाद्या व्यक्तीचे स्वातंत्र्य मौल्यवान आहे यात शंका नाही, परंतु ते प्रत्येक परिस्थितीत निरपेक्ष असू शकत नाही, असे निरीक्षण न्या. नीला गोखले यांच्या एकलपीठाने नोंदवले. एखाद्या समुदायाचे सामूहिक हित हे संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कापेक्षा अधिक महत्त्वाचे असते. गुन्ह्याचे स्वरूप, गांभीर्य आणि तीव्रता विचारात घेऊन आरोपींना जामीन मंजूर करणे हे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने जामीन फेटाळताना नमूद केले. तथापि, न्यायालयाने सीबीआयला आपला तपास लवकरात लवकर पूर्ण करून रीतसर अहवाल सत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com