अर्ज भरण्यासाठी उरले अवघे तीन दिवस
अर्ज भरण्यासाठी उरले अवघे तीन दिवस
मुंबई, ता. २७ : महापालिका निवडणुकीत बंडखोरी होऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष काळजी घेत आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुक उमदेवारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपांवर तोडगा निघू शकलेला नाही. उद्यापर्यंत युतीची चर्चा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कॉॅँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातही जागावाटपाबाबत निर्णय झालेला नाही. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत तयार आहे. मुंबईतील जागांबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याचे राष्ट्रवादी मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी सांगितले. त्यातच अवघे तीन दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले आहेत. एबी फॉर्म उमेदवारांच्या घरी पाठविले जातील, असे काही पक्षांतून सांगितले. त्यामुळे बंडखोरी होऊ नये, यासाठी राजकीय पक्ष काळजी घेत आहेत. त्यातच शेवटच्या तीन दिवसांत उमेदवारी भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

