भटक्या श्वानांमुळे वसईकर हैराण
भटक्या श्वानांमुळे वसईकर हैराण
वर्षभरात ४४ हजार जणांना दंश, निर्बिजीकरण संथगतीने
विरार, ता.३ (बातमीदार)ः वसई-विरार शहर महापालिका हद्दीत वर्षभरात तब्बल ४४ हजार नागरिकांना श्वानदंशाची नोंद असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वारांचा समावेश आहे. त्यामुळे श्वांनामुळे नागरिकांचे सामाजिक, सार्वजनिक आरोग्य संकटात आले आहे.
भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असलेली निर्बीजीकरण प्रक्रिया कागदावरच असल्याचे वास्तव वसई-विरार शहरात आहे. पालिकेसाठी मोजकीच निर्बीजीकरण केंद्रे उपलब्ध असून त्यांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी, श्वान निर्बीजीकरणाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. दुसरीकडे कचऱ्याचे ढीग, हॉटेल, मांस दुकानदारांकडून रस्त्यांवर टाकले जाणारे मृत प्राण्यांच्या अवशेषांमुळे भटक्या श्वानांना सहज खाद्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे मोकाट श्वानांनी संख्या दिवसेंदिवस वाढली आहे.
-------------------
जीवघेण्या आजारांचा धोका
श्वान दंशानंतर रॅबीजसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण होतो. मात्र, पालिकेच्या दवाखान्यांमध्ये लसींची कमतरता भासते. नागरिकांचा जीव धोक्यात असताना प्रशासनाची बेफिकिरी अक्षम्य आहे. निर्बिजीकरण केंद्रांची संख्या तातडीने वाढवणे, कचरा व्यवस्थापन प्रभावी करणे, श्वानांची शास्त्रीय गणना करणे, अशा मागण्या पुढे येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

