केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष समाजात जाऊन लोकांशी संवाद साधण्यात शिक्षणाचे मर्म
केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष समाजात जाऊन लोकांशी संवाद साधण्यात शिक्षणाचे मर्म
- प्राचार्य डॉ. अरविंद उबाळ
विरार, ता. १० (बातमीदार) : वर्गाच्या चार भिंतीच्या मर्यादेत बंदिस्त राहून केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष समाजात जाऊन लोकांशी संवाद साधण्यात शिक्षणाचे मर्म आहे. लोकभावना समजून घेणे, ज्ञान मिळवणे आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक क्षमता विकसित करणे, यासाठी महाविद्यालयातील मानव्य शाखेच्या विभागांनी विविध विषयांवरील सर्वेक्षणे तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्षेत्राधारित अध्ययनाचा भाग म्हणून राबविण्यात आलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा विश्लेषित अहवाल शनिवारी (ता. १०) सादर करण्यात आला. त्याच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, डॉ. दीपा कत्रे, अंतर्गत दर्जा हमी कक्षाचे समन्वयक डॉ. हिरानंद खंबायत तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख व शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वेक्षणाचा उद्देश विविध सामाजिक गटांचे जनमत समजून घेणे, स्थानिक पातळीवरील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणे तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रकार्याचा अनुभव देणे हा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

