उन्हाळी शेतीला संजीवनी
उन्हाळी शेतीला संजीवनी
कुर्झे धरणाच्या कालव्याची साफसफाई सुरू
तलासरी, ता.१३ (बातमीदार)ः तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाच्या कालव्यातील गाळ, गवत काढण्याचे काम जलसंपदा विभागाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे उन्हाळी शेतीसाठी पाणी मिळणार आहे.
कुर्झे धरणात ९७.०५ टक्के पाणीसाठा आहे. तर धरणाची पाण्याची पातळी ७०.०५ मीटर नोंदवण्यात आली आहे. या धरणातून कुर्झे, तलासरी, वडवली तसेच महामार्गालगतच्या इतर गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी अकरा किलोमीटर लांबीच्या कालव्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कालव्याच्या आवश्यक दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. या कालव्यातून शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

