टोलनाक्याच्या मुद्द्याला बगल

टोलनाक्याच्या मुद्द्याला बगल
Published on

टोलनाक्याच्या मुद्द्याला बगल
भाजप-शिवसेनेने जाहिरनाम्यातून वगळले
भाईंदर, ता.१३ (बातमीदार): दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी मिरा भाईंदर शहरातील एक महत्त्वाची समस्या आहे. हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून उपस्थित होतो. परंतु, मिरा-भाईंदर पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप, शिवसेनेने या मुद्द्याला बगल दिल्याचे चित्र आहे.
दहिसर टोलनाक्यावर होत असलेली वाहतूक कोंडी सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. सकाळी, सायंकाळी होत असलेल्या कोंडीमुळे पाऊण ते एक तास वाया जातो. प्रत्येक विधानसभा, महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून मुद्द्याचे भांडवल केले जाते. दहिसर टोलनाका बंद करणार, स्थलांतर, वाहतूक कोंडीतून मुक्ती देणार अशी आश्वासने आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा अपवाद वगळता भाजप, शिवसेनेला मात्र मतदारांशी निगडीत मुख्य समस्येचा विसर पडल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com