हक्काच्या जमिनीसाठी लढा

हक्काच्या जमिनीसाठी लढा

Published on

हक्काच्या जमिनीसाठी लढा
४५ वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ आक्रमक
बोईसर, ता. १३ (वार्ताहर) : परिसरातील राणीशिगाव, हनुमाननगर, चंद्रनगर, आजूबाजूच्या गावांतील जमीन पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे. मात्र, संबंधित जमिनींचे सातबारा, ताबा अथवा मालकी हक्क नावावर नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
जमिनीतून पाट नेण्यात आला असताना शेतीसाठी पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप पूर्ण झालेले नाही. बुलेट ट्रेन तसेच वाढवण बंदर प्रकल्पासाठीही सर्वेक्षण झाले असले, तरी स्थानिकांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत जमिनींची नोंद व योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकल्पाला विरोध राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
--------------------------
१९ जानेवारीला महामोर्चा
पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर १९ जानेवारीला महामोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना योग्य मोबदला दिल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू दिले जाणार नाही. शासनाने स्थानिकांच्या जमिनी, घरे, उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावावा, त्यानंतर प्रकल्पांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालघर आदिवासी एकता परिषदेचे सचिव भरत वायडा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com