निवडणूक आयोगाने लोकशाहीचे वाटोळे केले - आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड

निवडणूक आयोगाने लोकशाहीचे वाटोळे केले - आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड

Published on

लोकशाहीचे वाटोळे केले
निवडणूक आयोगावर आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची टीका
ठाणे, ता. १५ ः प्रशासकीय यंत्रणेवर सरकारचा प्रचंड दबाव पाहता यापुढील निवडणुका सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात. म्हणजे निवडणूक आयोगाचा खर्च वाचेल, असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लावला. सध्याचे वातावरण पाहता निवडणूक आयोगासाठी शब्द नाहीत. त्यांनी लोकशाहीचे वाटोळे केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया या वेळी दिली.
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. मुंब्य्रातील काही केंद्रांमध्ये उमेदवारांचे बॅनर लावल्याचा प्रकार घडला. त्यात ठाण्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद होणे, विजेचा धक्का लागणे असे अनुभव आले. याविषयी माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकशाहीची ही अखेरची घटिका असल्याचे सांगितले. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात कोणत्याही राजकीय बॅनरबाजीला मनाई असते; पण येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी ही खास परवानगी कोणत्या आधारे दिली, हे आयोगाने तपासावे. खरे तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असून या देशाच्या लोकशाही आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची लक्तरे निघत आहेत, असे ते या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com