गणेश नाईकांचा निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप
मतदानासाठी एक तासाची धावपळ
गणेश नाईकांचा निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : एक तासाच्या धावपळीनंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला; मात्र या दरम्यान निवडणूक यंत्रणेतील घोळामुळे नाईक परिवाराला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. याप्रकरणी वनमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर गंभीर आरोप करत, यंत्रणा टू द पॉइंट काम करत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गणेश नाईक कुटुंबासह मतदानासाठी घराबाहेर पडले; मात्र दोन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जाऊनही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत मिळाली नाहीत. जवळपास एक तास हा गोंधळ सुरू होता. अखेर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक आणि सून कल्पना नाईक यांची नावे आढळली आणि त्यांनी मतदान केले; मात्र पुतणे माजी महापौर सागर नाईक व त्यांच्या पत्नीचे नाव कुटुंबासोबत नसून वेगळ्या मतदान केंद्रावर असल्याचे समोर आले. त्यामुळे नेहमी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या संपूर्ण नाईक परिवाराला या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदान करावे लागले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गणेश नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदार यादी अद्ययावत ठेवण्यात यंत्रणेला अपयश येत आहे. सामान्य मतदारांची तर काय अवस्था होत असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

