बंद कारखान्यात जिवाला धोका

बंद कारखान्यात जिवाला धोका
Published on

बंद कारखान्यात जिवाला धोका
तारापूर परिसरात रासायनिक कचऱ्याचा साठा
बोईसर, ता.२०(वार्ताहर)ः तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बंद अवस्थेत असलेल्या कारखान्यांमध्ये रासायनिक घनकचरा साठवला जात आहे. या ठिकाणी कोणतीही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंद कारखान्यांच्या प्रवेशद्वारांवर कंपनीचे नाव, धोक्याचे इशारे किंवा माहिती फलक लावलेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात, आग किंवा रासायनिक गळती झाल्यास जबाबदारी नेमकी कोणाची, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. रासायनिक कचऱ्याचा असुरक्षित साठा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी धोका ठरू शकतो. या प्रकारामुळे औद्योगिक परिसरातील कामगार, स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने पाहणी करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
------------------------------
सुरक्षा रामभरोसे
- कारखान्यांमध्ये साठवलेला रासायनिक कचरा साठवला जात आहे, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत की नाहीत. या ठिकाणची देखरेख कोण करत आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
- याविषयी तारापूरचे उप प्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांच्याकडे विचारणा केली असता मला या विषयाची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com