काजू पिकातून अपेक्षित उत्पन्नाचा अंदाज
काजू पिकातून अपेक्षित उत्पन्नाचा अंदाज
श्रीवर्धन तालुक्यातील बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण
श्रीवर्धन, ता. ३१ (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्यात काजू पिकाला अनुकूल वातावरण असून, यंदा अपेक्षित उत्पन्न येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील काजू बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
श्रीवर्धन तालुक्यात वेंगुर्ला चार व वेंगुर्ला सात या जातीच्या काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात ६४५.०० हेक्टर क्षेत्रात काजू लागवड आहे.
काजू झाडांची चांगली निगा राखल्यास काजूच्या झाडांना लागवडीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. काजूच्या झाडाला नोव्हेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात होते. मोहोर आल्यानंतर फळ तयार होण्यासाठी पासष्ट ते सत्तर दिवसांचा कालावधी लागतो. श्रीवर्धन तालुक्यातील उत्तम निचऱ्याची जमीन, थोड्याफार प्रमाणात आम्लयुक्त जमीन तसेच डोंगर उतारावरील तांबड्या मातीची जमिनी काजू पिकासाठी चांगली आहे. वरकस जमिनीत काजूचे झाड चांगले पोसले जाते. तालुक्यातील उष्ण व दमट हवामान काजूसाठी अनुकूल असून, यंदाच्या हंगामात वेळेत मोहोर आल्याने बागायतदार समाधान व्यक्त करत आहेत. बागायतदार तयार काजू फळ मुंबई, पुणे शहरांतील घाऊक व्यापाऱ्यांना तसेच स्थानिक बाजारपेठेत पाठवत असून ओल्या व सुक्या काजूगरांना बाजारात चांगली मागणी असते.
फोटो - 142
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

