

बदलत्या हवामानाची अवकृपा
जांभळाची आवक कमी होण्याची भीती
विरार, ता. २१ (बातमीदार) ः वसईच्या नगदी फळपिकांमधील जांभूळ पिकाला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोहोर गळून किंवा करपल्याने जांभूळ उत्पादक चिंतित आहेत.
वसईचे जांभूळ पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक हातभार लावणारे पीक आहे. उत्पादन काळात ८०० ते १,२०० असा भाव मिळतो. तर एका झाडापासून सर्वसाधारण ५० ते ८० टिपे उत्पादन मिळते. त्यामुळे ४० ते ८० हजारांचे उत्पन्न जांभळांतून मिळत असल्याने आर्थिक हातभार लागतो; मात्र काही वर्षांपासून हवामानातील होणारे बदल जांभळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करत आहे.
--------------------------
हंगाम लांबणीवर
बदलत्या हवामानामुळे जांभळाचा हंगाम पावसापर्यंत लांबत गेला आहे. फळांवर पाऊस पडला की त्यांची चव, रंग, दर्जा घसरतो. यामुळे भरपूर फळे देणारे पीक वाया जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.