विजेअभावी बागायतदारांचे नुकसान

विजेअभावी बागायतदारांचे नुकसान

रेवदंडा, ता. २५ (बातमीदार) : रेवदंडामधील विठोबा आळी, गणपती आळी, बाजारपेठेतील काही भागात महिनाभरापासून वीजप्रवाह कमी जास्‍त होत आहे. त्‍यामुळे विजेची उपकरणे नादुरुस्‍त होण्याचे प्रकार वाढले आहेत. आधीच तापमानाचा पारा वाढला आहे, त्‍यात वीजप्रवाह वारंवार कमी-जास्‍त होत असल्‍याने घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर आंबा, काजू, केळी, सुपारीला पाणी देण्यात अडचणी येत असल्‍याने बागायतदार चिंतेत आहेत.
उष्‍मा वाढल्‍याने दररोज बागायतीत पाणी शिंपावे लागते. सुपारीच्या झाडांना तर दररोज पाणी द्यावे लागते, मात्र वीजपुरवठा कमी दाबाने हो असल्‍याने पाण्याचे पंप चालत नाहीत किंवा सुरू असलेले पंप अचानक नादुरुस्‍त होत असल्‍याने भुर्दंड सहन करावा लागत असल्‍याचे राजेश मुकादम (रा.विठोबा आळी) या बागायतदाराने सांगितले. दैनंदिन गरजांसाठीही पाण्याची गरज असून विजेअभावी साठवण टाकीत पाणीच जात नसल्‍याने नागरिक त्रस्‍त आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे पतसंस्था, सहकारी बँकांच्या कामावरही परिणाम झाला आहे. याबाबत महावितरणचे स्थानिक कनिष्ठ अभियंता तेजस खाले यांच्याशी संपर्क साधला असता, अखंडित वीजपुरवठ्यासाठी नवीन ट्रान्स्‍फॉर्मर बसवण्याची गरज असून यासंदर्भात वरिष्‍ठ कार्यालयाकडे प्रस्‍ताव पाठवला असल्‍याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com