४०० रोपांची लावून अरण्यऋषींना अभिवादन
रेवदंडा, ता. ३० (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील नागाव परिमंडळातील चौल-भोवाळे घुमट परिसरातील सुमारे तीन एकर वनजमिनीवर सुमारे ४०० रोपे लावून अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमात चौल येथील निसर्गप्रेमी संस्था, बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, वन विभाग, भगवती ग्रुप भोवाळेमधील नागरिक, पर्यटक आदी सहभागी झाले होते. स्वरा काठे या बालिकेच्या हस्ते रोप लावण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाल्यावर करंज, चिंच, काजू, बदाम अशा स्थानिक प्रजातींची रोपे लावण्यात आली. या वेळी वन विभागाचे अधिकारी मौलेश तायडे, उदय हटवार, प्रभाकर भोईर, मयूरेश तायडे उपस्थित होते. रोपांची लागवड केल्यानंतर अनेकांनी अरण्यऋषींच्या कार्याचा गौरव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.