तुलसी विवाहानंतर लग्नसराईचा मोसम सुरू

तुलसी विवाहानंतर लग्नसराईचा मोसम सुरू

Published on

तुलसी विवाहानंतर लग्नसराईचा मोसम सुरू
पुरोहितांकडे विवाह मुहूर्तांसाठी गर्दी
रेवदंडा, ता. ११ (बातमीदार) ः तुलसी विवाहाचा मंगल विधी पार पडताच कोकणात लग्नसराईचा हंगाम औपचारिकरीत्या सुरू झाला आहे. पारंपरिक श्रद्धेनुसार तुलसी विवाहानंतर विवाह सोहळ्यांसाठी शुभ मुहूर्त निघतात, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वधू-वरांच्या पालकांकडून पुरोहित व ज्योतिषांकडे लग्नतारखा ठरविण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेनंतर चातुर्मासाची समाप्ती होत असल्याने हिंदू संस्कृतीत विवाहयोग पुन्हा सुरू होतो. त्यामुळे जिल्‍ह्यातील गावागावात विवाह मुहूर्त ठरविण्याची लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक लग्न सोहळ्यांमध्ये अडथळे आले होते. यंदा अशा अडचणी टाळण्यासाठी अनेक कुटुंबे फेब्रुवारी ते मे दरम्यानच्या उपलब्ध शुभ तारखांमध्ये विवाह सोहळे आयोजित करण्याची तयारी करत आहेत. पुरोहितांकडून तारीख निश्चित होताच विवाहसोहळ्याच्या पुढील तयारीसाठी पालक वर्ग विवाह हॉल, आचारी, ताशेवाले, मंडपवाले व इतर सेवाप्रदात्यांकडे धाव घेताना दिसून येत आहेत. कोकणातील एप्रिल आणि मे हे दोन महिने पारंपरिकदृष्ट्या "लगीनघाईचे" मानले जातात, मात्र यावर्षी लग्नसराई थोडी आधीच सुरू झाली आहे. दरम्यान, विवाह मुहूर्तांची तयारी करत असतानाच येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडसादही चर्चेत आहेत. त्यामुळे लग्नसोहळे व निवडणुकीच्या तयारीचा दुहेरी उत्साह कोकणात पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com