

TMS 2.0 system launched
ESakal
मुंबई : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस २.० प्रणालीमुळे (ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टीम) रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्यव्यवस्था निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.