इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचाय? शिक्षणमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचाय? शिक्षणमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुंबई : बारावी परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असतो. अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीच्या गुणांना महत्व देण्यात येते. त्यामुळे बारावीत अधिक गुण मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीच्या गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग विचाराधीन असल्याचे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात बारावीच्या गुणांऐवजी सीईटीच्या गुणांना महत्व देण्यात येते. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा कल सीईटी परीक्षेत अधिक गुण मिळवण्याकडे वाढत आहे. परंतू याचा फटका विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी बसत आहे. प्रवेशावेळी दोन विद्यार्थ्यांचे सीईटी परीक्षेतील गुण समान आल्यावर अशावेळी बारावीचे गुण त्याचप्रमाणे फिजिक्‍स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी या विषयांचे गुण पाहिले जातात. यामध्ये ज्याचे गुण अधिक असतील अशा विद्यार्थ्याला प्रवेशात प्राधान्य दिले जाते. या नियमांमध्ये सीईटी परीक्षेला अवास्तव महत्व निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीच्या गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सीईटी परीक्षेचे गुण व बारावीचे गुण एकत्रित करून निकाल लावण्यासंदर्भात किंवा अन्य कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल का याबाबत पडताळणी करत असल्याचे, सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com