
नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर : “घाम येत होता म्हणून तो क्षणभर दरवाजा जवळ गेला... आणि त्या क्षणाने त्याचे संपूर्ण आयुष्यच हिरावलं”. दिवा-मुंब्रा लोकल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात उल्हासनगरचा २३ वर्षीय केतन सरोज याने आपले प्राण गमावले. रोजची नेहमी सारखीच सुरुवात, पण शेवट मात्र काळजाला चिरून टाकणारा ठरला. या अपघाताने केवळ एका तरुणाचे नव्हे, तर एका कुटुंबाच्या आशा-आकांक्षांचाही अंत झाला आहे.