वाडा : अवकाळी पावसाचा शेतीला फटका; हरभरा व कलिंगड पिकाचे नुकसान

नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
Wada Farms
Wada Farmssakal media

विरार : गेल्या आठवड्यात दिवस-रात्र कोसळलेल्या अवकाळी पावसाने (Untimely rain) वाडा (Wada) तालुक्यातील कलिंगड व हरभरा पिकांचे अतोनात नुकसान (watermelon and gram farming loss) झाले आहे.अलिकडेच लागवड केलेली कलिंगडाची रोपे मरुन जाऊन अक्षरशः त्यांचा चिखल झाला आहे. वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे चार हजार हेक्टर क्षेत्र असुन या क्षेत्रातील निम्मे पिक गेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त केले आहे.

विशेषतः हरभरा, मुग, वाल या रब्बी पिकांना या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या नुकसान भरपाईची पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे शेतकऱ्यांनी केली आहे. वाडा तालुक्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कलिंगड, खरबूज पिकांची लागवड करतात. यावर्षी काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील विविध गावांमध्ये 30 ते 35हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड केली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात दिवसरात्र कोसळलेल्या पावसाने कलिंगड, खरबूजाची लागवड केलेल्या शेतांची तळे करुन टाकली.

शेतांमध्ये एक ते दिड फूट उंचीपर्यंत पाणी बारा ते पंधरा तास भरुन राहिल्याने कलिंगडाची रोपे मरुन गेली आहेत. शेतात रोप दिसत नसून चिखल झालेला दिसून येत आहे. कलिंगड पिकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. मोठा खर्च वाया गेल्याने कलिंगडाची लागवड केलेले शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहेत. सांगे येथील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांनी तीन एकर क्षेत्रावर केलेली कलिंगड पिकाची लागवड संपूर्ण उध्वस्त झाली आहे. तर अंबिस्ते बुद्रुक येथील संजय पाटील या शेतकऱ्याच्या दोन एकर क्षेत्रावरील कलिंगड पिक अवकाळी पावसाने जमीनदोस्त केले आहे.

कलिंगड पिकासाठी प्रति एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च येत असतो, हा संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडले आहेत. हरभराचे उत्पन्न घेणा-या शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हरभरा पिकांमधील शेतांमध्ये गुडघाभर पाणी भरल्याने हे पीकसुद्धा उध्वस्त झाले आहेत. मूग, वाल या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रब्बी, भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच विज उत्पादन करणारे व्यावसायिक यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व जास्तीत जास्त या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील बाधीत शेतकऱ्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com