

Vande Bharat Coastal Cyclothon
विरार : देशाच्या सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा बळकट व्हावी या दृष्टीने भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांच्या वतीने आयोजित 'वंदे भारत कोस्टल सायक्लोथॉन' सायकल रॅली ही देशव्यापी राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी या रॅलीचे जूचंद्र चंडिका देवी मंदिराच्या पायथ्याशी आगमन झाले होते. यावेळी त्यांचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.