'नाईकांचा पुरस्कार चव्हाणांच्या नावावर', सुधारित परिपत्रक काढण्याची सरकारला विनंती

'नाईकांचा पुरस्कार चव्हाणांच्या नावावर', सुधारित परिपत्रक काढण्याची सरकारला विनंती

मुंबई : शासनाने 'जलक्रांतीचे जनक' संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी वसंत विचारधारा मंचच्या शिष्टमंडळाने  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष-महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळात राजेश चव्हाण, वसंत राठोड. डी.डी  नाईक आदी उपस्थित होते.   

महाराष्ट्र राज्य शासनाने 12 जुन 2020च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वरगीय शंकररा चव्हाण यांच्या जयंतीदिनी जल क्रांतिकाचे जनक म्हणून 'जलभुषण पुरस्कार' प्रदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु राज्यात जलक्रांतीची सुरूवात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव  नाईक यांनी केली आहे. ”पाणी अडवा, पाणी जिरवा” हा मुलमंत्र देवून जलसंधारण खाते सुरू केले. त्यामुळे पाणलाेट विकास क्षेत्राचे जनक” या नावांने नाईक यांना ओळखले जाते.

याशिवाय शासनाच्या लोकराज्य मासिकात सुधाकरराव नाईक यांचा जलक्रांतीचे जनक म्हणून उल्लेख करण्यात आले आहे. असे असताना देखील राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीदिनी 'जलभुषण पुरस्कार' प्रदान करण्यासंदर्भात काढलेले परिपत्रक  रद्द करून  मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंत दिनी पुरस्कार देण्याचे सुधारित परिपत्रक काढण्यात यावे अशी मागणी वसंतविचारधारा मंचने निवेदनात केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )  

vasantrao vichar manch demands to make correction in the GR issued by government

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com