भीतीचे कारण नाही; एपीएमसीत आहे 'या' जीवनावश्यक साधनांचा मुबलक साठा

भीतीचे कारण नाही; एपीएमसीत आहे... या साधनांचा मुबलक साठा
भीतीचे कारण नाही; एपीएमसीत आहे... या साधनांचा मुबलक साठा

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईतील भाजी मंडया आठवड्यातून काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती व महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत होती; परंतु विक्रेत्यांकडे भाजीपाल्याचा मुबलक साठा आहे. एपीएमसी मार्केटमधून भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरू असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

रविवारी (ता. २२) ‘जनता संचारबंदी’ असल्याने शुक्रवारी-शनिवारी भाजी मंडयांत ग्राहकांची गर्दी होऊ शकते, असा अंदाज बांधूत भाजी विक्रेत्यांनी यापूर्वीच साठा करून ठेवला. एपीएमसी मार्केट बंद असले, तरी विक्रेत्यांच्या गाळ्यांमध्ये भाजीपाला आहे. आवक सुरळीत सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत, अशी माहिती भायखळा मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली.

दादरची भाजी मंडई सोमवार, गुरुवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येईल. भाजीपाल्याची आवक व्यवस्थित सुरू आहे. ग्राहकांची गर्दी कमी झाल्याने आवश्‍यकतेनुसार माल मागवण्यात येतो, असे दादर येथील विक्रेते संदीप भुजबळ यांनी सांगितले.

एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शुक्रवारी ९७० गाड्या भाजीपाला आला. या बाजारातून मुंबईतील विक्रेते पुरेसा भाजीपाला घेऊन जातात. 
- शंकर पिंगळे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com