Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; 26 नगरसेवकांचे राजीनामे

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; 26 नगरसेवकांचे राजीनामे

ठाणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी बंडखोरीचा फटका बसत असताना मुंबई आणि ठाणे परिसरात सत्ताधारी शिवसेनेला याचा जास्त फटका बसल्याचे दिसत आहे. उल्हासनगर, कल्याणमधील सुमारे 26 नगरसेवक आणि 300 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेमधून नाराजीचा सूर समोर आला आहे. तिकीट वाटपावरून स्थानिक नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आज सकाळी 26 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेसह भाजपाच्याही अडचणी वाढल्या आहेत. 

स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ सर्वांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे बोडारे समर्थकांची नाराजी समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com