

मुंबई : शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी राज्य सरकार बळाचा वापर करून जमिनी घेत आहे. तुम्ही दमदाटी करून जमिनी घेणार आहात का? शेतकऱ्यांना स्थानबद्ध केले जात आहे, गावाभोवती पहारे ठेवले जात आहेत, अशा पद्धतीने महामार्ग करताच कशाला ? असा प्रश्न विचारत काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर मंगळवारी टीकेची झोड उठवली.