

virar Narangi Railway Crossing
ESakal
मुंबई : विरार स्थानकाजवळील ‘नारंगी रेल्वे फाटक’ म्हणून ओळखले जाणारे एलसी-४१ हे रेल्वे फाटक लवकरच बंद होणार आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या नव्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार (ता. ८) पासून हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विरार पूर्व-पश्चिम वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीतील अडथळेही कमी होणार आहेत.