Thane News : पाणी प्रश्न सुटेपर्यंत इमारतींना ओसी नाही; ठाणे महापालिका आयुक्तांनाचा पवित्रा

ठाण्यातील घोडबंदर भागात नव्याने मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांमध्येकरोडो रुपये खर्चून नागरिक घर घेत आहे.
Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation sakal

ठाणे - ठाण्यातील घोडबंदर भागात नव्याने मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांमध्येकरोडो रुपये खर्चून नागरिक घर घेत आहे. तर, दुसरीकडे करोडो रुपये खर्चून घर घेवून आजही या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.

त्यामुळे घोडबंदरच्या पाण्याचे नियोजन होत नाही तो पर्यंत ओसी देऊ नका असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर विकास विभागाला दिले आहेत. तसेच पाण्याचे ऑडिट होणे अपेक्षित असताना,सन २००८ नंतर पाण्याचे ऑडिट झाले नसल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या जनसुनावणीत समोर आली आहे.

ठाण्यातील अनेक भागात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. त्यात घोडबंदर भागातील गृह्संकुलाना देखील त्याचा फटका बसत असून पाण्यासाठी पैसे मोजवे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करून या समितीची महिन्यातून दोन वेळा बैठक घेण्याच्या अटीवर ठाण्यातील बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयालयाने २०१७ मध्ये दिले होते.

मात्र २०१७ साली स्थापन झालेल्या या तक्रार निवारण समितीच्या पाच वर्षात केवळ दोनच बैठका झाल्या होत्या. त्यानंतर बुधवारी महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत घोडबंदर मधील अनेक नागरीकांनी हजेरी लावली होती. तसेच शहरातील इतर भागातील नागरीकांना देखील हजेरी लावली होती.

यावेळी घोडबंदर भागातील पाण्याची समस्या आजही सुटु शकलेली नसल्याचे वास्तव या जनसुनावणीत पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. घोडबंदर भागाला मंजुर असलेल्या पाण्याचा कोटा मिळत नाही. अनेक भागात आजही कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी पाण्याची आजही बोंब आहे, वेळेवर पाणी येत नाही, आले तरी ते किती वेळ आहे, याची माहिती उपलब्ध नसते.

त्यामुळे येथील गृहसंकुलांना दरमहा टँकरसाठी पाच ते सात लाखांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे वास्तव येथील रहिवासी उदय शृंगारपुरे यांनी अधोरेखीत केली. पाण्याची समस्या सुटावी यासाठी २०१३ पासून प्रयत्न केले जात असतांना देखील अद्यापही या भागाची पाण्याची समस्या सुटली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यातही, पाणी नसतांनाही या भागात नव्याने बांधकामे उभी होत आहेत, आधीच्या रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नवीन लोकांना पाणी कसे मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाण्याचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत घोडबंदर भागात नव्या बांधकामांना ओसी न देण्याचे आदेश शहर विकास विभागाला दिले आहेत.

शहरात पाण्याची समस्या असतांना त्याचे नियोजन कसे केले जाते, किती पाणी येते किती पाणी ठाणेकर नागरीकांना दिले जाते. पाण्याचा अपव्यय कशा पध्दतीने केला जातो, याची माहिती कशी मिळविली जाते. त्यासाठी पाण्याचे ऑडीट महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाते का? असा सवाल दक्ष नागरीक चंद्रहास तावडे यांनी केला.

यावेळी २००८ नंतर पाण्याचे ऑडीटच झाले नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अखेर आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापुढे दरवर्षी पाण्याचे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी पाण्याचे ऑडीट अशी अपेक्षा ठाणेकर नागरीक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com