

Mumbai Water Supply
ESakal
विष्णू सोनवणे
मुंबई : मुंबईतील असमान पाणीवाटपाचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय तांत्रिक समस्या नसून मुंबईकरांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाचे निगडित आहे. ही समस्या आता दीर्घकालीन होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी आता दोन्ही उपनगरांतून होऊ लागली आहे. दक्षिण मुंबईत मुबलक पाणी मिळताे तर, उपनगरांमध्ये मात्र मर्यादित पुरवठा केला जातो, असा आरोप पाणी हक्क समितीने केला आहे.