

Thane Water Supply
ESakal
ठाणे : मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील साठा केवळ २८ टक्क्यांवर घसरल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतल्याने ठाणे शहरालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आधीच तुटवड्याच्या छायेत असलेल्या ठाण्यावर पाणीकपातीचे गंभीर सावट पसरले आहे.