

West Asia war impacting on Maharashtra
ESakal
नितीन जगताप
मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाने महाराष्ट्राच्या लघु व मध्यम उद्योगांचे आर्थिक कंबरडे माेडले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वधारल्यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच हाेर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गातील अडथळ्यांमुळे निर्यात ठप्प झाली असून, लघुउद्याेग आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यभरातील ५० लाख कंत्राटी कामगारांवर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळली आहे.