बारावीचा अभ्यासक्रम बदलणार; पाहा काय असेल बदल...

बारावीचा अभ्यासक्रम बदलणार; पाहा काय असेल बदल...
बारावीचा अभ्यासक्रम बदलणार; पाहा काय असेल बदल...

मुंबई : राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार चालू शैक्षणिक वर्ष हे बारावीच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष असणार आहे. या निर्णयाची पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाने केले आहे.

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नव्या अभ्यासक्रमाची घोषणा यापूर्वीच केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना सध्या शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचे हे शेवटचे वर्ष असणार आहे. २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध असतील. जून २०२० मध्ये ही नवीन पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. 

पुस्तकांशिवाय गैरसोय
सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना मंडळामार्फत एप्रिल महिन्यात नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र, पुस्तके मे महिन्यापूर्वी बाजारात न आल्यास खासगी शिकवणी चालकांची मोठी गैरसोय होऊ शकते. तसेच बारावीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुस्तकांची वाट पाहत बसावे लागण्याची शक्‍यताही शिक्षक व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com