
अलिबाग : रायगड जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई तीव्र होते. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो; परंतु आता प्रशासनाने त्या पुढेही पाऊल टाकत ‘झिंक ॲल्युमिनीयम मेटेलिक’ टाकीचा पर्याय स्वीकारला आहे. अशा टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून ते शुद्ध करून पिण्यासाठी वापरण्यात येत आहे.
महाड, पोलादपूर, कर्जत तालुक्यातील २४ ठिकाणी अशा टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘झिंक ॲल्युमिनीयम मेटेलिक’चा प्रकल्प २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्णय आहे. यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्यावतीने ‘जलस्वराज्य - २’ कार्यक्रमांतर्गत आणि जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्राधान्याने हा प्रकल्प सुरू आहे.
पाणीटंचाई कालावधीत प्रतिदिन, माणसी २० लिटर शुद्ध पाणी त्यामुळे मिळणार आहे.
गेल्या वर्षी २७ ठिकाणी उपाययोजनांच्या कामांना मंजुरी मिळाली असून महाडमध्ये ८, पोलादपूरमध्ये १२ आणि कर्जतमध्ये ३ अशी २४ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी चार कोटी दहा लाख २५ हजार १८४ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. याद्वारे जिल्हा टॅंकरमुक्त करण्याचा प्रयत्न आहे.
दृष्टिक्षेप
-लोकसंख्येवर अधारित झिंक टाकीची क्षमता आणि आकार अवलंबून आहे.
-एक लाख ते नऊ लाख लिटर क्षमतेच्या या टाक्या आहेत.
-पावसाचे पाणी साठवण करून मार्च ते जून या पाणीटंचाईच्या कालावधीत - पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
-या वर्षी ५२ ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत.
-भविष्यात पोलादपूर तालुक्यातील ४०, महाड ५, खालापूर तीन आणि - -कर्जतमध्ये चार टाक्या बसवण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.