

रामेश्वर काकडे
नांदेड : कमी शिक्षण व अज्ञानातून दिवसेंदिवस बालविवाहांची संख्या वाढत आहे. जबाबदारीतून मुक्त होण्याच्या उद्देशाने आई-वडील कोवळ्या वयातच मुला-मुलींचे लग्न लावून देत असल्याने भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयात संसार कसा करू बाबा? हे वास्तव यानिमित्ताने पुढे आले.