
रामेश्वर काकडे
नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट अधिकच गडद होत चालले असून, गेल्या सात महिन्यांतील आकडे धक्कादायक आहेत. जानेवारी २०२५ पासून जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. म्हणजेच, सरासरी प्रत्येक तीन दिवसांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.