

Nanded
esakal
देगलूर: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षेबाबत धडक कारवाईला वेग आला असून अनेक व्यावसायिकांमध्ये धडकी भरली आहे. मात्र देगलूर शहर व परिसरात या कारवाईचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक चौकांमधील हॉटेले, उपाहारगृहे, नाश्ता केंद्रे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये आजही नियमांची सर्रास पायमल्ली होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.