अर्धापुरात सरपंचपदाचा फिफ्टी- फिफ्टीचा फार्मुला; आपणे सगळे भाऊ-भाऊ;  सत्तेचा तीळ वाटून खावूचा प्रत्येय

file photo
file photo
Updated on

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : असे म्हणतात की एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता. आपल्या सुखात, आनंदात आपल्या स्नेही जणांना सहभागी करण्याचा तो एक भाग आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंचाची खुर्ची एकच असल्यामुळे एका वेळेस एकालाच बसता येते. तसेच हा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो. पण निवडूण आलेल्या आपल्याच गटातील सदस्यांना सरपंच, उपसरपंच होण्याची तीव्र इच्छा असते. अशा परिस्थितीत वाद नको व आपला सदस्य फुटून विरोधी गटाला मिळू नये यासाठी यंदा तालुक्यात सरपंच व उपसरपंच पदाच्या काळाची वाटणी फिफ्टी- फिफ्टी करण्यात आली आहे.तालुक्यातील सुमारे दहा ते पंधरा गावात अशी सत्तेची वाटणी झाली आहे. यात काही मोठ्या व छोट्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे अशी माहिती समोर येत आहे.

तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीणे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. गावच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक सर्वात अवघड मानली जाते. त्याची कारणे तशीच आहेत. या निवडणुकीत सगळे उमेदवार एकाच गावातील, भावकीतील तसेच मित्रपरिवार, नातेवाईक असतात. कोणाला निवडावे कोणाला सोडावे असे अनेक प्रश्न मतदारांना पाडतात तसेच उमेदवारांना प्रचार करणेही आवघड असते.

तालुक्यातील बहुतांश गावात एकाच गटाला बहूमत मिळाले आहे. काही मोठ्या गावात सत्ता परिवर्तन झाले आहे. एकाच गटातील सदस्यांना सरपंच, उपसरपंच होण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे पॅनलप्रमुखासमोर राजकीय अडचणी निर्माण झाल्या. अशा गावात अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरपंच व उपसरपंच पदाच्या काळाची वाटणी करण्यात आली. आपल्या गटातील दोन सदस्यांना सत्तेचे समान वाटप करण्यात आले. सरपंच, उपसरपंच पदाचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतांना त्याची विभागणी अडीच- अडीच वर्षे करण्यात आला आहे.

राजकारणात शब्द, वचने दिली जातात. ग्रामीण भागात शब्दाला खूप मोठे महत्व आहे. सरपंच, उपसरपंच पदासाठी शब्द देण्यात आले आहेत. काही गावात लिखापडी तर काही गावात शपथा घेण्यात आल्या असल्याची चर्चा आहे. निवडणुकीत दिलेले वचने फारसे पळाली जात नाहीत. गेल्या पाच वर्षाच्या काळात आपल्याच नेत्यांनी, सदस्यांनी शब्द फिरवल्याच्या घटना आहेत. तसेच येणा-या अडीच वर्षाच्या काळात अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळचे दूर व दुरचे जवळ येवू शकतात. तसेच आपल्याच गटात सत्तेच्या मलीद्यावरुन वाद होवू शकतो. अशा परिस्थितीत दिलेला शब्द व वचन किती पाळले जाते हे येणारा काळच ठरविल, तोपर्यंत भावी सरपंच, उपसरपंच म्हणून वेळ काढावी लागणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com